यह ब्लॉग खोजें

बुधवार, 9 दिसंबर 2020

भांडण्याचे परिणाम (गोष्ट)

 दोन मांजरांनी एकदा खवा चोरून आणला पण त्याचे वाटे करण्यासाठी त्यांच्यात भांडणे सुरू झाली. तेव्हा आपणास सारखे वाटे करून द्यावे अशी त्यांनी एका वानरास विनंती केली. वानराने ती विनंती मान्य केली व त्या खव्याचे दोन भाग करून ते तराजूच्या दोन्ही पारड्यात घातले. 

त्यापैकी एक भाग मोठा असल्यामुळे त्या बाजूचे पारडे खाली झाले. तेव्हा त्यातील बराच खवा तोंडात टाकून त्या वानराने तराजू पुन्हा उचलला, तो दुसरे पारडे खाली बसले. त्यातील आणखी बराच खवा तो घेत आहे इतक्यात ती मांजरे म्हणाली, 'वानर दादा, आमची समजूत झाली, राहिलेला खवा आमचा आम्हाला द्या.'

 वानर म्हणाला, 'मूर्खांनो, तुमची समजूत झाली असेल पण न्यायदेवतेची समजूत झाली पाहिजे ना ? तुमचा खटला फार भानगडीचा असल्यामुळे तो इतक्या लवकर संपणार नाही.' असे म्हणून दर वेळी तराजू उचलावा व प्रत्येक वेळी त्यातला खवा खावा असे त्याने चालवले होते. 

खवा अगदी थोडा राहिला असे पाहून ती मांजरे अगदी काकुळतीला येऊन त्या वानराला म्हणाली, 'वानर दादा, आता राहिला आहे तेवढा खवा तरी आम्हाला द्या.' वानर हसत म्हणाले, 'मित्रांनो, माझ्या मेहनतीबद्दल मला काही बक्षीस नको का ?' आणि उरलेला खवा त्याने चटकन तोंडात टाकला.

तात्पर्य

- थोडेसे नुकसान सहन करून आपल्या भांडणाचा निकाल आपापसात करणे चांगले

मंगलवार, 1 दिसंबर 2020

अविचाराने घडला अनर्थ (गोष्ट)

 एका शिकार्‍याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्‍याला इच्छा झाली. 

त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले.

 सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. 

इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्‍याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.

तात्पर्य

- अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.

दानशूर कर्ण ( गोष्ट )

 कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, अशी त्याची ख्याती होती. प्रतिदिन सकाळी तो स्नानास नदीवर जाई. पाण्यात उतरून सूर्याला अर्घ्य देई. स्नान झाल्यावर परत येत असतांना त्याच्यापुढे जो याचक येई, तो कधीही विन्मुख परत जात नसे.

        एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन  गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता  कर्णाच्या दानशूरपणाविषयी  बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ''कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.'' या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ''श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.'' सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ''ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.''

        पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ''राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.'' धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ''काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?'' सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले.

        त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, "एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?'' असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. 

श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ''कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?'' त्यावर कर्ण उद्गारला, '' या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?''

        पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली आणि आपल्या त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले.

        मुलांनो, दानशूर कर्णाची गोष्ट आपण पाहिली. आपल्याला आपली छोटीशी वस्तूही देण्याची इच्छा नसते. येथे तर त्याने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली. आपल्यालाही आपल्या वस्तूंचा त्याग करता आला पाहिजे.

चाणाक्ष माणूस ( गोष्ट )

मुद्दे : (एक चाणाक्ष माणूस - मंत्रजाप करणे - चुकीचे उच्चार करणे - देवाऐवजी भूत प्रसन्न - भुताची अट - माझ्याकडून काम घेणे थांबवले तर तुला खाऊन टाकणार - माणसाची युक्ती - एक मल्लखांब जमिनीत गाडून त्यावर चढ उतर - जेव्हा मी बोलावीन तेव्हा माझे काम करायला ये - तात्पर्य)


 एका मनुष्यानं देवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी कुठल्याशा मंत्राचा जप सुरु केला, पण त्या मंत्राचा जप करताना शब्दांचे उच्चार चुकीचे केल्यामुळे, त्याच्यावर देवाऎवजी भूत प्रसन्न झाले व ते त्याच्यासमोर प्रकट झाले.

ते भूत त्याला म्हणाला, 'तू मागशील ते मी तुला देईन आणि तू सांगशील ते मी करीन, पण जर का तू मजकडे काही मागायचा अथवा मला काम सांगायचा थांबलास, तर मात्र मी तुला खाऊन टाकीन.'त्या माणसानं आंबे मागितले, भुतानं आंब्याचा हंगाम नसतानाही टोपलीभर आंबे त्याला आणून दिले !त्यानं घराची झाडलोट करायला सांगितली, भुतानं दोन बायांची ती कामगिरी चार पाच मिनिटात उरकून टाकली !त्यानं सुंदरपैकी स्वयंपाक करायला सांगितला, भुतानं पंचपक्वान्नांसहित असा स्वयंपाक हातोहात तयार करुन ठेवला !दहा हजार रुपयांची मागणीही त्या भुतानं अशीच बघता बघता पूर्ण केली !

'मागून मागून आता एकसारखं मागायच तरी काय ? या विचारात तो मनुष्य पडला असता, ते भूत त्याला म्हणालं, 'मला सांगण्यासारखं काहीच काम नाही ना तुझ्या जवळ ? मग मी आता तुला खाऊन टाकतो.'भुताची एक धमकी ऎकून त्या माणसाला एक युक्ती सुचली. तो त्या भुताला म्हणाला, 'एक मल्लखांब तयार करुन तो मागल्या अंगणात पूर पाहू ?'मल्लखांब तयार करुन, तो पुरलादेखील,' भूत म्हणालं.

तो गृहस्थ त्या भुताला म्हणाला, 'बस्स ! आता त्या मल्लखांबावर अखंड चढणं उतरणं हेच तुझं मुख्य काम. फक्त मी बोलावीन तेव्हा माझ्याकडे यायचं, आणि माझं काम झालं रे झालं, की या मल्लखांबाकडे जाऊन, त्याच्यावर चढत उतरत राहायचं.'

अशा तर्‍हेने त्या मनुष्यानं त्या भुताकडून आयुष्यभर आपली कामे करुन घेतली. 

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

ढोंगी बगळा (गोष्ट)

 उन्हाळा वाढत चालला होता. नद्या, नाले, ओढे, डोंगरावरून पडणारे ओहोळ कोरडे पडू लागले. रानातील गवत सुकले. पाणथळ जागेच्या आश्रयाने पक्षी घरटी बांधू लागले. एक बगळा झाडाच्या शेंड्यावर बसला होता. सूर्य मावळत होता. बगळ्याची नजर दूरवर असलेल्या एका तळ्याकडे लागली होती. तळ्यात खूप मासे फिरत असलेले त्याला दिसत होते. आपल्याला ते कसे मिळतील या विचारात असता सूर्यास्त झाला. झाडावरच तो झोपी गेला.


सकाळ झाली तशी बगळा उठला. पंख पसरून उडत उडत तो तळ्याकाठी आला. एकेक पाऊल टाकीत तो तळ्यात उतरला. एक पाय उचलून, चोच वर करून त्याने डोळे मिटले व "राम राम" म्हणू लागला. तळ्यात शिरता क्षणी काठावरचे मासे सुळकन तळ्यात गेले. थोड्यावेळाने एक बारीक मासा त्याच्याजवळ आला व धिटाईने त्याला म्हणाला, " अहो बगळेबुवा, तुम्ही आम्हाला खात कसे नाही?" त्यावर बगळा म्हणाला, "अरे, आता मी मासे खाणे सोडून दिले. मी फक्त पाण्यात उभे राहून ध्यान करतो व तोंडाने "राम राम" म्हणतो. बगळा आपल्याला खात नाही असे बघून मासे धीट झाले. ते त्याच्याजवळून पोहू लागले. 

काही दिवसांनी तो माश्यांना म्हणाला, "तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळा वाढतो आहे. या तळ्याचे पाणी आटणार, मग तुमचे कसे होणार?" मग आम्ही जायचे कोठे? एक मासा म्हणाला. त्यावर बगळा म्हणाला, " माझे लक्ष आहे. या डोंगरापलीकडे एक मोठे तळे आहे. त्यात खूप पाणी आहे. लाटांवर लाटा उसळत असतात. त्यात मासे आहेत, कासवे आहेत, बेडूक आहेत. पण! "पण म्हणजे?" मासे म्हणाले. "तुम्ही त्या तळ्यात कसे जाणार? मी तुम्हाला तिकडे नेऊ शकेन, पण एका वेळी फक्त चौघांना. याल तुम्ही?" बगळा म्हणाला. "हो हो. आम्ही नक्की येऊ." मासे म्हणाले.

दुसरे दिवशी बगळा तळ्यात उतरला. त्याच्या भोवती मासे जमले. त्याने आपल्या चोचीत चार मासे घेतले व तो आकाशातून उडत उडत जाऊ लागला. गाव ओलांडले, ओढा पार केला व डोंगर माथ्यावर आला. तो हळूहळू खाली उतरू लागला. मासे म्हणाले , "बगळेबुवा, आपले तळे कुठे आहे?" तशी बगळा म्हणाला, "कुठचे तळे, आणी कुठचे पाणी. मी आता तुम्हाला खाणार आहे." असे म्हणून त्याने एकेक मासा खडकावर आपटून खाऊन टाकला. उंच झाडावर बसून फांदीला आपली चोच पुसली व सायंकाळी त्याच झाडावर झोपला. दुसऱ्या दिवशी परत चार मासे खाल्ले. असे बरेच दिवस चालले.

 

हे सर्व एक खेकडा गवतावर बसून पाहत होता. तिरका तिरका चालत तो त्याच्या जवळ आला व त्याचा पाय पकडून म्हणाला, " बगळेबुवा, मला केंव्हा नेणार मोठ्या तळ्यात?" बगळा मनात म्हणाला, "मी रोज मासे खातो आहे. चला आज खेकडा खाऊ." खेकडा म्हणाला नेणार ना? "चल, आज तुला नेतो." बगळा म्हणाला. खेकडा त्याच्या पायावरून चढत जाऊन त्याच्या पाठीवर बसला. त्याला घेऊन बगळा उडाला व नेहमीप्रमाणे डोंगरावर उतरू लागला. 

खेकड्याने खाली पाहिले. खेकड्याला त्याचा डाव कळला व म्हणाला, " बगळेबुवा, हा तर डोंगर आहे." त्यावर बगळा हसला व म्हणाला," कुठचे तळे व कुठचे पाणी. आता मी तुला खाणार आहे." खेकडा त्याच्या मानेवर उतरला व म्हणाला, "बऱ्या बोलानं मला माझ्या तळ्यात नेऊन सोड. नाहीतर तुझी मान कापीन." बगळा व खेकड्यामध्ये झटापट सुरू झाली. 

खेकडा त्याच्या मानेवर बसल्याने त्याला काहीच करता आले नाही. खेकड्याने आपल्या नांग्या त्याच्या मानेत रुतवल्या व त्याची मान कापली. दोघेही डोंगरावर आपटले. खेकडा तिरका तिरका चालत डोंगऱ्याच्या पायथ्याशी आला व रानातून चालत चालत परत आपल्या तळ्याच्या काठापाशी आला व डुबकन पाण्यात उतरला. त्याला पाहून मासे त्याच्या भोवती गोळा झाले. खेकडा माशांना म्हणाला, "अरे, तो बगळा पक्का ढोंगी होता. मी त्याला ठार मारले आहे. कितीही उन्हाळा वाढला तरी या तळ्यातील पाणी आटणार नाही. या तळ्यात भरपूर पाणी आहे."

अशा रितीने बाकीचे मासे त्या तळ्यात पुन्हा आनंदाने नांदू लागले.


बुधवार, 28 अक्तूबर 2020

समानार्थी (part 2) Std 10th

  1. पाय - पद, चरण
  2. उशीर - विलंब
  3. संध्याकाळ - सायंकाळ
  4. रस्ता - मार्ग
  5. काटा - कटंक
  6. गोडी - मधुरता/आवड/ रुची
  7. संघर्ष - लढा
  8. द्रव्य - धन, संपत्ती
  9. शौर्य - पराक्रम
  10. शेवट - अंत
  11. गीत - गाणे
  12. नाच - नृत्य
  13. थोरली - मोठी
  14. आवाका - व्याप्ती
  15. उत्कंठा - उत्सुकता
  16. संधी - मोका
  17. कसब - कौशल्य
  18. शेपटी - पुच्छ
  19. आंधळा - अंध
  20. चौकस -  सतर्क
  21. खूण - निशान, चिह्न
  22. दक्षता - खबरदारी
  23. माती - मृदा
  24. दौलत - संपत्ती
  25. तन - शरीर, काया
  26. पान - पर्ण
  27. पक्षी - खग, पाखरू
  28. स्वाक्षरी - सही
  29. घर - गृह
  30. खेळ - क्रीडा
  31. स्तुती - प्रशंसा
  32. स्वाद - चव
  33. वडील - पिता
  34. लाडका - आवडता
  35. प्रगती - उन्नती, विकास
  36. नदी - सरिता, तटिनी
  37. आश्चर्य - नवल
  38. फिकीर - काळजी
  39. अपुरे - अपूर्ण
  40. आर्जव - विनंती
  41. गांभीर्य - गंभीरता
  42. भीषण - भयानक
  43. संपदा - संपत्ती

समानार्थी मराठी (part 1) 10 std

  1.  आभाळ - आकाश, नभ
  2. वाट - रस्ता, मार्ग
  3. संकट - विपत्ती
  4. रसना - जीभ
  5. उदक - जल, पाणी
  6. मधुरता - गोडी
  7. मेघ - ढग
  8. आठवण - स्मरण
  9. दीनवाणे - केविलवाणे
  10. बिकट - कठीण
  11. झोप - निद्रा
  12. विश्वास - खात्री
  13. डोके - मस्तक
  14. पारंगत - तरबेज, निष्णात
  15. लठ्ठ - जाडजूड
  16. साखर - शर्करा
  17. वायू - हवा, पवन, वारा, वात
  18. प्रारंभ - सुरुवात
  19. कटू - कडू
  20. संकल्प - निर्धार
  21. प्रयत्न - प्रयास
  22. क्षमा - माफी
  23. ताबा - नियंत्रण
  24. लाज - लज्जा
  25. बातमी - वार्ता
  26. अधें  - निम्मे
  27. परिवर्तन - बदल
  28. चंद्र - शशी
  29. रात्र - निशा, रजनी
  30. अश्रू - आसू
  31. मित्र - सखा
  32. बायको - पत्नी
  33. क्रोध - राग
  34. कीव - दया
  35. अवधान - लक्ष
  36. आनंद - हर्ष
  37. आवाज - ध्वनी
  38. पैसा - वित्त, धन
  39. ऐट - रुबाब
  40. उत्साह - उल्हास

शुक्रवार, 4 सितंबर 2020

Std 10 unit 2 वाक्प्रचार

 1 - गहाण ठेवणे  - तारण ठेवणे

मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्याने आपली जमीन गहाण ठेवली.

2 - मोर्चा वळवणे - विशिष्ट काम करण्यासाठी जाणे

सैनिकांनी शत्रूशी लढण्यासाठी आपला मोर्चा वळवला.

3 - वरमणे - भावना आवरणे / लाज वाटणे

सुरेखाला शिक्षिकांनी सर्वांसमोर ओरडले म्हणून ती वरमली.

4 - स्वतःशी पुटपुटणे - तोंडातल्या तोंडात बोलणे

घराची दशा पाहून आई रागाने स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होती.

शुद्धीवर आल्यावर रीमा काहीतरी स्वतःशीच पुटपुटत होती.

5 - मळमळ व्यक्त करणे - नाराजी व्यक्त करणे

पगार कमी दिल्याबद्दल कामगारांनी आपली मळमळ व्यक्त केली

6 - चेहरा पडणे - शरम वाटणे / लाज वाटणे

कामवाल्या चारुमावशींना आई ओरडली म्हणून त्यांचा चेहरा पडला.

परीक्षेत नापास झाल्यामुळे कमलचा चेहरा पडला.

7 - गडबडून जाणे - धांदल उडणे

अचानक परीक्षेची घोषणा झाल्यामुळे मुले गडबडून गेली.

8 - आ वासून पाहणे - आश्चर्याने पाहणे

जेव्हा पहिली आगगाडी चालली तेव्हा तिथे जमलेले लोक आ वासून पाहत होते.

9 - ये जा करणे - इकडून तिकडे जाणे

अनेक लोकांना नोकरीसाठी कल्याण ते मुंबई दररोज ये-जा करावी लागते.

10 - न पटणे - मान्य नसणे

तुला रांगोळी काढता येत नाही, ही गोष्ट मला पटत नाही.

नेहमी प्रथम येणारी शोभा नापास झाली, ही गोष्ट मला पटत नाही.

11 - वाव नसणे - संधी नसणे 

आमच्या घरी मुलींना एकटी परदेशाला जाण्याची वाव नाही.

12 - हातभार लावणे - मदत करणे

मी नेहमी माझ्या आईला घरकामात हातभार लावतो.

13 - तापाने फणफणणे - खूप ताप येणे 

पावसात खूप भिजून आल्यावर राजूला सर्दी झाली व रात्री तो तापाने फणफणू लागला.

14 - भारावून जाणे - प्रभाव पडणे

जादूचे खेळ पाहून मुले भारावून गेली.

ताजमहालाचे सौंदर्य पाहून मुले भारावून गेली.

15 - कमीपणाचे वाटणे - हीन दर्जाचे वाटणे

काही लोकांना रिक्शा चालवण्याचे काम कमीपणाचे वाटते.

घराची साफसफाई करणे आजकालच्या मुलांना कमीपणाचे वाटते.

16 - भरभरून बोलणे - खूप मनातले सांगणे

फार दिवसांनी माहेरी आलेली मुलगी आईशी भरभरून बोलत होती.

17 - भास होणे - भ्रम होणे/ चाहूल लागणे

अंधारात मला असा भास झाला की खोलीत कुणीतरी लपला आहे

18 - आर्थिक परिस्थिती खालावणे - पैशांची चणचण भासणे

लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली.

19 - धीर न सोडणे - हिंमत न हारणे

वडिलांच्या मृत्यूनंतर धीर न सोडता आईने सुदीपला खूप शिकवले.

20 - न खचणे - कठीण परिस्थितीत कोलमडून न जाणे

रामला अपघातात आपला पाय गमवावा लागला पण न खचता त्याने आपले जीवन पुन्हा सुरू केले.

पूर आल्यामुळे सर्व काही नष्ट झाले तरी ही रामभाऊ खचले नाही.

21 - परिस्थिती बेताची असणे - आर्थिक स्थिती जेमतेम असणे/ कसेबसे दिवस काढणे

पूर आल्यामुळे सगळी पिके बर्बाद झाली म्हणून या वर्षी शेतकऱ्याची परिस्थिती बेताची आहे.

22 - स्वतःला झोकून देणे - कार्यात समरस होणे

परीक्षा जवळ आल्यामुळे मुलांनी अभ्यासात स्वतःला 

झोकून दिले.

23 - पाया पक्का होणे - मूळ ज्ञान भक्कम होणे

माझ्या गणिताच्या शिक्षकांमुळे गणितात माझा पाया पक्का झाला.

24 - आंतरिक ओढ वाटणे - मनापासून इच्छा उत्पन्न होणे

संत नामदेवांना विठ्ठलाच्या भेटीसाठी आंतरिक ओढ वाटत होती.

25 - डोळयांत पाणी उभे राहणे - डोळयांत अश्रू येणे

दीपाची चूक नसतानाही तिला शिक्षा मिळाली म्हणून तिच्या डोळयांत पाणी उभे राहिले.

26 - अंगावर काटा उभा राहणे - भीतीने शहारा येणे/ घाबरणे

हत्ती आणि सिंहाची लढाई पाहून माझ्या अंगावर काटा उभा राहिला.

27 - पडेल ते काम करणे - कोणतेही काम करणे

गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अंजनेशने पडेल ते काम केले.

28 - गोडी लावणे - आवड लावणे

भावे सरांनी मुलांना चित्रकलेची गोडी लावली.

28 - संस्कार करणे - चांगले विचार रुजवणे

आईवडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे.

29 - भान देणे - जाणीव निर्माण करणे

महात्मा गांधींनी भारतीय लोकांना स्वातंत्र्याचा भान दिला.

30 - सामना करणे - मुकाबला करणे

कामगाराला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

31 - डोळे पाणावणे - रडू येणे, डोळयांत अश्रू येणे

गरीब लोकांचे हाल पाहून शिवाजीरावांचे डोळे पाणावले.

32 - शाश्वती नसणे - भरवसा नसणे 

सोहन डॉक्टर होईल अशी कुणालाही शाश्वती नव्हती.

 Lesson 6 चूडीवाला

33 - पर्वणी असणे - आनंदमय काळ मिळणे

दिवाळीची सुटी ही आमच्यासाठी एक पर्वणी असते.

34 - समजूत काढणे - पटवून सांगणे

राजूने नवीन मोबाइलसाठी हट्ट धरला होता पण आईने त्याची समजूत काढल्यावर त्याने हट्ट सोडला

35 - कीव येणे - दया येणे

भिकारी थंडीत कुडकुडत होता, मला त्याची कीव आली.

36 - गलका करणे - खूप आवाज करणे

सहलीला जाण्याच्या आनंदात मुले वर्गात गलका करू लागली.

37 - आतुरतेने वाट पाहणे - उत्सुकतेने वाट पाहणे

रमा आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होती.

38 - सत्कार होणे - सन्मान होणे

आज माझ्या मित्राचा आदर्श विद्यार्थी म्हणून सत्कार झाला.

39 - संकोच वाटणे - भीड वाटणे

गुरुजींकडून पैसे घेताना गरीब मुलाला फारच संकोच वाटत होता.

40 - भारावून जाणे - प्रभावित होणे 

महात्मा गांधींचे भाषण ऐकून सर्व लोक भारावून गेले होते.

41 - हातभार लागणे - मदत मिळणे

गरीब लोकांना सरकारने मोफत राशन दिले त्यामुळे त्यांना थोडा हातभार लागला.

42 - आश्वासन देणे - हमी देणे

यावर्षी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असा सरकारने आश्वासन दिला.

43 - डोळे लावून बसणे - सतत वाट पाहणे

आई नोकरीवरून कधी परत येते यासाठी राजू आणि नेहा डोळे लावून बसले होते.

44 - आयुष्याचे मोल देणे - जीवन समर्पित करणे

सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आयुष्याचा मोल दिला.

45 - मान खाली घालणे - नम्र होणे 

मालक नोकराला शिव्या देत होते तरीही नोकर मान खाली घालून ऐकत होता .




गुरुवार, 3 सितंबर 2020

सहायक क्रिया

निम्नलिखित वाक्यों को ध्यान से पढ़िए :

१) मैंने खाना खाया ।

इस वाक्य में एक ही क्रिया है - खाया (खाना)

यह मुख्य क्रिया है। 

२) मैंने खाना खा लिया ।

इस वाक्य में संयुक्त क्रिया है - खा लिया

इसमें पहली क्रिया मुख्य क्रिया और दूसरी उसकी सहायक क्रिया है। 

खा (खाना) - मुख्य क्रिया

लिया (लेना) - सहायक क्रिया

३) उसने काम किया । ( मुख्य क्रिया - किया - करना )

४) उसने काम कर दिया

(मुख्य क्रिया - करना, सहायक क्रिया - देना)

५) मैं घर नहीं गई । (मुख्य क्रिया - गई) 

६) मैं घर नहीं जा सकी।  

( मुख्य क्रिया - जाना, सहायक क्रिया - सकना)

प्रश्न 1. सहायक क्रिया के रूप में वाक्यों में प्रयोग करो -

लेना, जाना, देना, सकना,  चुकना, 

1.   लेना  ( लिया )

राम ने पैसा ले लिया। 

मैंने कपड़े धो लिए।

उसने पढ़ाई कर ली।

2    जाना ( गई)

मेरी गाड़ी चली गई।

मेरी गाड़ी चली जाएगी।

मुझसे भूल हो गई।

अब मुझसे नहीं खाया जाएगा।

3.  देना  ( दिया/ दी/ दिए)

उसने मेरा कप तोड़ दिया ।

मैंने उसे काम करने दिया।

4 सकना  (सका)

क्या कोई उत्तर दे सकेगा ?

मैं घर नहीं पहुँच सका । 

क्या कोई यह सह सकता है ?

5 चुकना ( चुका/ चुकी/ चुके)

मैं खाना खा चुकी थी।

मैं काम कर चुकी हूँ।

मैं खेल चुका हूँ।

वे घर जा चुके। 

प्रश्न 2 सहायक क्रिया पहचानो :

1 उसने कई फूल तोड़ लिए। 

उत्तर. सहायक क्रिया - लिए (लेना)

2 दीपा ने कपड़े सुखा दिए।

उत्तर - सहायक क्रिया - दिए ( देना)

3 गाँव वाले मेहनत कर रहे थे।

उत्तर - सहायक क्रिया -रहे - ( रहना)

 सहायक क्रिया -  थे (होना) 

स्वाध्याय :

प्रश्न : सहायक क्रिया पहचानो :

1 आप यहाँ नहीं रह सकते।

2 मैंने उस पार्सल को उठा लिया।

3 उसकी बात मैं नहीं समझ सकी थी।

4 वे जल्दी लौट जाते हैं।

5 अपनी जिंदगी सेवा में लगा दी जाए।







प्रेरणार्थक क्रिया

किसी दूसरे से काम कराना - प्रथम प्रेरणार्थक क्रिया

दूसरे से कहकर किसी और से काम करवाना - द्वितीय प्रेरणार्थक क्रिया

उदा - मोनू ने खाना खाया. ( इसमें प्रेरणार्थक क्रिया नहीं है)

माँ ने मोनू को खाना खिलाया( इसमेें प्रथम प्रेरणार्थक क्रिया है)

( माँ - मोनू )

माँ ने नौकर द्वारा मोनू को खाना खिलवाया । ( इसमें द्वितीय प्रेरणार्थक क्रिया है)

(माँ - नौकर - मोनू)

प्रश्न - क्रियाओं के प्रेरणार्थक रूप लिखो -

मूल क्रिया        प्रथम प्रे.           द्वितीय प्रे.

खाना                खिलाना              खिलवाना

पीटना              पिटाना                पिटवाना

झूलना               झुलाना                झुलवाना

कूदना               कुदाना                कुदवाना

स्वाध्याय :

(  लिखना, देखना, सीखना, भूलना, बोलना, बनना, चढ़ना, मिलना, हटना, जागना, पीना, सीना, गिरना, भागना, छोड़ना, तोड़ना, )


प्रश्न २ वाक्य में आई हुई प्रेरणार्थक क्रिया का प्रकार बताओ

१    मैंने ड्राइवर से गाड़ी चलवाई।

 उत्तर - चलवाई - चलवाना - द्वितीय प्रेरणार्थक क्रिया

२     माँ ने बच्चे को झूला झुलाया।

उत्तर  - झुलाया - झुलाना - प्रथम प्रेरणार्थक क्रिया

३       मैंने बहन से कहकर नौकर द्वारा कमरा साफ करवाया।

उत्तर - करवाया -  करवाना - द्वितीय प्रे. क्रि.

४     आज मैने अपने घर का सारा कचरा हटाया।

उत्तर  - हटाया   -  हटाना -    प्रथम प्रेरणार्थक

५      दीपेश ने  छोटे भाई को रुलाया।

उत्तर - रुलाया- रुलाना - प्रथम प्रेरणार्थक क्रिया

स्वाध्याय :

प्रश्न 1 - निम्नलिखित प्रेरणार्थक क्रियाओं को अपने वाक्यों में प्रयोग करो:

बनवाना - 

चलवाना

निकलवाना 

चिढ़ाना

पकाना

पकवाना

कटाना

जगाना

जगवाना








मंगलवार, 18 अगस्त 2020

वाक्प्रचार Std 9 unit 3

1 स्वागत करणे - आदर सत्कार करणे

2 दंग होणे - गुंगून जाणे, मग्न होणे

3 मनात झुरणे - मनात खंत करणे

4 नाकेबंदी करणे - कडक बंदोबस्त करणे

5 नजरेस पडणे - लक्षात येणे

6 खटाटोप करणे - खूप प्रयत्न करणे

7 बाजार पालथा घालणे - सर्वत्र धुंडाळणे to search in every nook and corner

8 हाडे खिळखिळी होणे - जीर्ण होणे/ जराजर्जर होणे to be extensively harmed or damaged

9 उसने मागणे - उधार मागणे

10 उपास काढणे - खायला न मिलणे

11 डोळे पांढरे होणे - खूप घाबरणे

12 घुस्सा होणे - राग येणे

13 स्वाधीन करणे - देणे / सोपवणे to hand over

14 विधिनिषेध बाळगणे - भेदाभेद करणे to follow certain rules and prohibitions

15 टोला देणे - जशास तसे सुनावणे

16 संधी मिळणे - मोका मिळणे

17 तिळपापड होणे - खूप राग येणे to be furious

18 मानगुटीस बसणे - कब्जा घेणे/ घट्ट पकडणे  to grab someone by neck

19 बेत ठरणे - पक्का विचार करणे to make a plan

20 स्थापना करणे - एका जागी ठेवणे

21 अनुमान करणे - योग्य तर्क करणे / अंदाज घेणे

22 माल लांबवणे -  वस्तू चोरणे / वस्तू लंपास करणे

23 टोमणा देणे - उपरोधिक बोलणे to taunt

24 बचाव करणे - सुरक्षित करणे to keep safe, to safeguard someone

25 तोंडाला कुलूप लावणे - काही न बोलता स्वस्थ बसणे, मौन धारण करणे 

26 नजर टाकणे - निरीक्षण करणे to take a glance at

27 स्तिमित करणे - आश्चर्यचकित करणे - to astonish

28 - गायब होणे - नाहीसे होणे to disappear

29 - मार्ग काढणे - शोध घेणे to find a way out

30 - अपेक्षा असणे - इच्छा असणे

31 - न उकलणे - न कळणे/ न समजणे

32 - नोंद असणे -  टिपण असणे / माहिती ठेवणे to keep information about something or someone

33 - प्रयाण करणे - निघून जाणे to start a journey

34 - रक्तात भिनणे - रक्तात विरघळणे deep rooting of a thought or feeling

35 - पुकार करणे - घोष करणे to proclaim / to call out







रविवार, 16 अगस्त 2020

वाक्प्रचार std 10th unit 1

1 मळ क्षाळणे - मळ धुणे

आईने पाणी व साबण वापरून कपड्यांचे मळ क्षाळले.

2 जन्म पावणे - जन्म घेणे

या भारतभूमीवर जन्म पावून मी धन्य झाले.

3 अधःपतन होणे - दर्जा घसरणे

वर्तमानकाळात शिक्षणाचा अधःपतन झाला आहे.

4 निघण्याच्या बेतात असणे - जाण्याच्या तयारीत असणे

जेव्हा आम्ही निघण्याच्या बेतात होतो, तेव्हाच आमची कार खराब झाली.

5 कडाक्याच्या थंडीने कुडकुडणे - अंग थरथरणे

एक गरीब बाई रस्त्याच्या कडेला कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होती.

6 कर्जबाजारी होणे - कर्जात बुडून जाणे

लॉकडाऊनमुळे अनेक लोक कर्जबाजारी झाले.

7 भीकेला लागणे - दारिद्रय वाट्याला येणे

रामभाऊंना व्यापारात खूप नुकसान झाला आणि ते भीकेला लागले.

8 गमावून बसणे - असलेले हरवून जाणे

नदीत पूर आल्यामुळे गावकरी आपले सर्वकाही गमावून बसले.

9 उसंत न लाभणे - वेळ न मिळणे

परीक्षा जवळ आल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी उसंत लाभत नाही.

10 चक्कर मारणे - फेरफटका मारणे

दररोज सकाळी मी बागेत चक्कर मारायला जाते.

11 हात जोडणे - नमस्कार करणे

मी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हात जोडले.

12 सुरुंग लावणे - एखादा बेत उधळून लावणे

मी सहलीला जाणार होते पण वडिलांनी परवानगी न देऊन माझ्या योजनेला सुरुंग लावले.

13 मूठभर मास चढणे - स्तुतीने हुरळून जाणे

गुरुजींनी श्यामची प्रशंसा केली म्हणून त्याला मूठभर मास चढले.

14 अंगाचा तिळपापड होणे - खूप संताप येणे

जेव्हा माझ्या भावाने माझा मोबाइल घेतला, तेव्हा माझ्या अंगाचा तिळपापड झाला.

15 हात दाखवून अवलक्षण - आपण होऊन संकट ओढवून घेणे

मी उपाशीपोटी राहू शकत नाही तरीही महाशिवरात्रीचा उपास करण्याचा संकल्प केला, याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण.

16 कानावर येणे - बातमी/वार्ता समजणे

एक सेप्टेंबरपासून शाळा उघडणार आहेत अशी बातमी लोकांच्या कानावर आली.

17 भीक न घालणे - पर्वा न करणे

सावित्रीबाई फुले लोकांच्या बोलण्याला भीक न घालता मुलींना शिक्षण देत होत्या.

18 झोप उडणे - बेचैन होणे

नवऱ्याला कैंसर झाला आहे, ही बातमी मिळाल्यापासून सावित्रीची झोप उडाली.

19 आस्था वाढणे - प्रेम वाटू लागणे

वडिलांना दररोज व्यायाम करताना पाहून माझी ही व्यायामावर आस्था वाढू लागली.

20 पारंगत असणे - कुशल असणे

माझी आई स्वयंपाक करण्यात पारंगत आहे.

21 अवहेलना करणे - अपमान करणे

कधीही गुरुजनांची अवहेलना करू नये.

22 सक्त ताकीद देणे - कडक समज देणे

माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, अशी मी माझ्या भावाला सक्त ताकीद दिली.

23 विचार पोकळ असणे - विचार तकलादू असणे

मी पूर्ण दिवस उपास करू शकते, हा विचार पोकळ आहे.

24 सूड घेणे - बदला घेणे

समीरने संजयचा सर्वांसमोर अपमान केला होता, त्याचा संजयने सूड घेतला.

25 हादडणे - जेवणावर ताव मारणे

आईने बटाटेवडे बनवले होते त्यांपैकी रामूने सहा वटाटेवडे हादडले.

26 वेड्यात काढणे -  बावळट समजणे

मी मुलांना शेत दाखवायला नेण्याचे ठरवले, तेव्हा सर्वांनी मला वेड्यात काढले.

27 हकालपट्टी करणे - हाकलून देणे

बैल म्हातारा झाल्यावर शेतकऱ्याने आपल्या घरातून त्याची हकालपट्टी केली.

28 खुलासा होणे - सविस्तर कळणे

काही मुलांनी वर्गात दंगामस्ती करण्याचा बेत केला होता, याचा गुरुजींना खुलासा झाला.

29 कमवून खाणे - स्वकष्टार्जित खाणे/ कष्टाने काम करून खाणे

आम्ही स्वतः कमवून खातो, कुणी आम्हाला जेवू घालत नाही.

30 समाचार घेणे - विचारपूस करणे 

मी आजारी पडल्यावर माझ्या मैत्रिणी माझा समाचार घेण्यासाठी घरी आल्या.

31 राखीव कुरण असणे - एखाद्या विषयात गती असणे ( to excel in something )

गणित विषयाचे कठीण प्रश्न सोडवणे माझ्या मैत्रिणीचे राखीव कुरण आहे/ रांगोळी काढणे हे सीमाचे राखीव कुरण आहे, असे तिला वाटते.

33 बळी पडणे - मान्य करणे/ अधीन होणे/ वशीभूत होणे( to be a victim of something) 

आजकालची तरुण पिढी अनेक व्यसनांना बळी पडू लागली आहे.

34 - धडगत नसणे - सुटका नसणे 

जर तू माझा मोबाइल घेतला, तर तुझी धडगत नाही

35 - क्षमा करणे - माफ करणे

लहानांच्या चुकांना क्षमा करणे हे मोठ्यांचे स्वभाव असते.

36 - जिभेवर ताबा नसणे - खाण्यावर/ बोलण्यावर नियंत्रण नसणे

आईने गुलाबजाम बनवल्यावर कुणाचाही जिभेवर ताबा राहू शकत नाही/

दीपा कुणालाही टोचून बोलते कारण तिचा जिभेवर ताबा नाही.

37 - कटाक्ष टाकणे - नजर तिरपी करून बघणे ( to glance)

परीक्षेत मी शिक्षकांची नजर चुकवून आपल्या मैत्रिणीकडे कटाक्ष टाकला.

38 - पश्चाताप होणे - केलेल्या चुकीची जाणीव होणे

रामूने आपल्या मित्राचा विश्वासघात केला याचा त्याला पश्चाताप झाला.

39 - भरल्या ताटावरून उठणे - न जेवता उठणे

आई रागावली म्हणून मोहन भरल्या ताटावरून उठला.

40 - इच्छा दाबून धरणे - इच्छा अडवून ठेवणे

मला नवीन मोबाइल घ्यायचा होता पण पैसे नसल्यामुळे मी ती इच्छा दाबून धरली.

41 - आदर दुणावणे - आदर दुप्पट होणे

सीमा गरीब मुलांना मोफत शिकवते, हे जाणून माझ्या मनात तिच्याविषयी आदर दुणावला.

42 - कबुली देणे - मान्य करणे

रामने श्यामला एक लाख रुपए देण्याची कबुली दिली.




वृक्षों का महत्त्व

 *वृक्षों का महत्त्व* ( निबंध )

वृक्ष हमारे जीवन का अस्तित्व हैं। पेड़ों के बिना धरती पर जीवन की कल्पना करना असंभव है। ये धरती पर अमूल्य सम्पदा के समान हैं। पेड़ों के कारण ही मनुष्य को अपनी मूलभूत आवश्यकताओं को पूरा करने के संसाधन प्राप्त होते हैं।

यदि पेड़ न हों तो पर्यावरण का संतुलन ही बिगड़ जाए और सब ओर तबाही मच जाए। आजकल मनुष्य विकास के नाम पर कंकरीट के जंगल बना रहा है और वे भी इस प्राकृतिक सम्पदा की कीमत पर।
यदि पेड़ काटने के साथ-साथ नए पेड़ों को नहीं लगाया गया तो इस ग्रह पर जीवन की संभावनाएँ ही खत्म हो जाएँगी।

पेड़ प्रकृति की वो देन है जिसका कोई विकल्प उपलब्ध नहीं है। पेड़ हमारा सबसे घनिष्ठ मित्र है। हमारे द्वारा लगाया गया पेड़ सिर्फ हमें ही लाभ नहीं पहुँचाता बल्कि आने वाली कई पीढ़ियों को लाभ पहुँचाता है।

हवा, पानी, खाने-पीने की सामग्री, ईंधन, वस्त्र, जानवरों का चारा अन्य कार्यों में प्रयोग करने के लिए लकड़ी सब हमें पेड़ों से ही मिलता है। पेड़ पर्यावरण से कार्बन डाईऑक्साईड लेकर बदले में ऑक्सीजन देते हैं।

पेड़ों पर कई जीव-जन्तु अपना घर बनाते हैं। यदि पेड़ न हों तो हम इन सब चीजों की कल्पना तक नहीं कर सकते।

लेकिन क्या मनुष्य इस प्राकृतिक संसाधन से अपना लाभ लेना ही जानता है या वह इसके संरक्षण और संवर्द्धन की और भी जागरुक है? वर्तमान की स्थिति देखकर ऐसा लगता है कि हम पेड़ों को बचाना तो चाहते हैं पर शायद उतना प्रयास नहीं कर पा रहे हैं जितना आवश्यक है।

ऐसी परिस्थिति में धीरे-धीरे प्रकृति का संतुलन बिगड़ता जाएगा और हम प्रकृति की इस अमूल्य सम्पदा को धीरे-धीरे पूरा खत्म कर देंगे। इस प्रकार इस धरती पर न जीवन होगा न जीव।

अतः हमें चाहिए कि हमारे आसपास हमें जितनी भी खाली भूमि दिखाई दे, हम वहाँ पौधारोपण करें और कुछ न हो सके तो अपने घर में गमलों में ही इस अमूल्य धरोहर को संरक्षित करें। यदि यह छोटा सा कदम हर व्यक्ति उठाएगा तो यह धरती और धरती पर जीवन सब खुशहाल रहेगा।

पेड़ों को हरा सोना भी कहा जाता है क्योंकि यह बहुत मूल्यवान सम्पदा है। धरती पर जीवन प्रदान करने वाली ऑक्सीजन और पानी प्रदान करने वाला मुख्य साधन पेड़ ही है। ऑक्सीजन प्रदान करने का कार्य और कोई नहीं कर सकता और पेड़ों के बिना पानी की कल्पना करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है।

पेड़ वायु प्रदूषण कम करने में हमारी सहायता कर पर्यावरण को शुद्ध रखते हैं। मात्र वायु प्रदूषण ही नहीं ये, हानिकारक रसायनों का छानकर जल को भी साफ करते हैं। हर उद्योग में पेड़ के उत्पाद का मुख्य योगदान रहता है। हमारे दैनिक जीवन में उपयोग होने वाली वस्तुओं में पेड़ों का बहुत महत्व है।
जितने अधिक पेड़ होंगे पर्यावरण भी उतना ही शुद्ध रहेगा। आजकल लोगों को वायु प्रदूषण के कारण कई प्रकार के साँस के एवं अन्य रोगों से पीड़ित होना पड़ रहा है।

यदि पेड़ होंगे तो हवा में मिली हानिकारक गैसों को शोषित कर हमें स्वच्छ हवा प्रदान करेंगे और रोगों से छुटकारा भी। यदि हम पेड़ों की संख्या में वृद्धि करेंगे तो ये प्राकृतिक रुप से हवा को स्वच्छ करने के साथ हमें और भी कई फायदे पहुँचायेंगे। इनकी वृद्धि से हम एयर कंडीशनर के उपयोग से बच कर इससे निकलने वाली हानिकारक गैसों से भी निजात दिलाते हैं। पेड़ के कारण ही हमें भरपूर वर्षा प्राप्त होती है।

पेड़ की जड़ें मिट्टी को बाँध कर रखती हैं जिनसे भूमि कटाव भी नहीं होता व भूमि जल को अच्छे से अवशोषित कर लेती है। यही जल भूमिगत जल बनकर हमें मनुष्य में पानी के अभाव से बचाता है। पेड़ हमें छाया प्रदान कर गर्मी के प्रभाव से भी धरती को बचाते हैं।

इस अमूल्य सम्पदा की कमी से धरती पर ग्लोबल वार्मिंग, सूखा, भूमि कटाव जैसे समस्यायें अपना विकराल रूप लेती जा रही हैं। यदि हम इस प्राकृतिक आपदाओं से बचना चाहते हैं तो हमें पेड़ों के संरक्षण की ओर कदम उठाने ही होंगे।

यदि आज हम इस दिशा में कार्य करेंगे तभी भावी पीढ़ी को भी इस ओर काम करने की प्रेरणा मिलेगी। ख़ुशी के अवसर पर हम पैसा खर्च करते हैं, दावतें करते हैं लेकिन इन सब के बजाय हम पौधारोपण और पेड़ों का संरक्षण करें तो ये सिर्फ हमारे जान-पहचान वालों के लिए ही नहीं बल्कि सारे सजीवों के लिए भी ख़ुशी का संकेत होगी।

भारतीय संस्कृति में तो वैसे भी पेड़ों की पूजा की बात कही गई है। एक जिम्मेदार नागरिक बनकर हमें यह सुनिश्चित करना चाहिये कि यदि विकास के नाम पर पेड़ कट रहे हैं तो क्या नए पेड़ लगाए भी जा रहे हैं या नहीं ?

ईष्वर ने मनुष्य को ही बुद्धि/विवेक का गुण प्रदान किया है। यदि इस बुद्धि का प्रयोग हम विकास के नाम पर प्रकृति को नुकसान पहुँचाने में करते रहे तो यह मनुष्य के विवेक पर धब्बा होगा। अतः आओ हम सब मिलकर संकल्प लें कि हम अपने लिए ही नहीं बल्कि पूरी प्रकृति के लिए पेड़ों के संरक्षण पर कार्य करेंगे और इस धरा को हरा-भरा करेंगे।

शनिवार, 15 अगस्त 2020

वाक्प्रचार 9th std unit 2

 1 ध्यानी ठेवणे - लक्षात ठेवणे

2 - जर्जर करणे - जीर्ण करणे (दशा वाईट करणे)

3 - शिकस्त करणे - खूप प्रयत्न करणे

4 - पर्वणी असणे - खूप आनंददायी घटना वाटणे

5 -  वसवणे - निर्माण करणे

6 - गौरव करणे - सन्मान करणे

7 - तरतूद असणे - उपलब्धी असणे/ व्यवस्था असणे

8 - ख्याती मिळवणे - कीर्ती / प्रसिद्धी मिळवणे

9 - दणाणून सोडणे - नादाने भरून जाणे

10  - संदेश देणे - चांगला विचार किंवा शिकवण देणे

11 - प्रशंसा करणे - स्तुती करणे

12 - गप्पा रंगात येणे - संभाषण रंगणे

13 - विचारात गढून जाणे - विचारात बुडून जाणे

14 - मात करणे - विजय मिळवणे 

15 - हसण्यावारी नेणे - गंभीरपणे दखल न घेणे (to take like a joke)

16 - आव्हान स्वीकारणे - सामना करण्यास सिद्ध होणे

17 - पाठपुरावा करणे - सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे

18 - विचारचक्र सुरू होणे - मनात अनेक विचार येणे

19 - पाण्यासारखा पैसा खर्च करणे - पैशांचा ओघ पुरवणे/ खूप पैसा खर्च करणे

20 - फुरसत मिळणे - वेळ मिळणे

21 - फोलपणा जाणवणे - व्यर्थपणा जाणवणे

22 - खटाटोप करणे - खूप प्रयत्न करणे

23 - रोषणाई करणे - दिव्यांच्या माळांनी सजवणे

24 - गवगवा होणे - प्रसिद्धी होणे/ बोलबाला होणे

25 - सन्मान करणे - आदरसत्कार करणे

26 - संकटांना तोंड देणे - संकटांशी सामना करणे

27 -  मरण पावणे - मृत्यू होणे

28 - तपश्चर्या करणे - साधना करणे 

29 - दातकुडी बसणे - दातखिळी बसणे, एक अक्षरही तोंडून न निघणे (locking of jaws due to pain)

30 - डोळे टक्क उघडे पडणे - झोप न लागणे

31 - मेंदूत रुतून बसणे - मनात घट्ट ठसून राहणे

32 - इडं पडणे  - वेढा पडणे ( to be surrounded by)

33 - मान डोलावणे - संमती देणे/ होकार देणे (to nod one's head in agreement)

34 - वावगे वागणे - चुकीचे वागणे

35 - टाळा पगळून बघणे - आश्चर्य वाटणे (to be awestruck)

36 - शिकणे सवरणे - सुशिक्षित होणे ( to be well educated)

37 - डोळयांत पाणी येणे - रडवेले होणे

38 - पोरके होणे - अनाथ होणे



गुरुवार, 13 अगस्त 2020

वाक्प्रचार 9 unit 1

 1 आस लागणे - ध्यास लागणे

2 सादर करणे - कार्यक्रम प्रस्तुत करणे

3 आस्वाद घेणे - गोडी चाखणे

4 नाव खराब करणे - बदनामी करणे

5  इशारा करणे - खूण करणे 

6 धीर सुटणे - आत्मविश्वास गमावणे

7 मनात चलबिचल होणे - मन अस्वस्थ होणे

8 सावरून धरणे - आधार देणे

9 डोळे मिटून ध्यान करणे - चित्त एकाग्र करणे

10 धक्का बसणे - मनात हादरणे 

11 दगा देणे - धोका देणे

12 शंका मनाला चाटून जाणे - अविश्वास निर्माण होणे

13 नवल वाटणे - आश्चर्य वाटणे

14 ग्रह चांगला होणे - मत चांगला होणे/ अनुकूल मनःस्थिती निर्माण होणे

15 प्रथा असणे - रीत असणे

16 - जिवाचे कान करून ऐकणे - खूप लक्षपूर्वक ऐकणे

17 - दम भरणे - रागावणे

18 चेहरा उतरणे - नाराज होणे

19 पत्ता नसणे - गायब होणे

20 बेचैन होणे - अस्वस्थ होणे

21 इकडची दुनिया तिकडे करणे - आकाश पाताळ एक करणे

22 सांत्वन करणे - दिलासा देणे

23 खिन्न होणे - व्यथित होणे/ निराश होणे

24 अगतिक होणे - लाचार होणे/ हतबल होणे

25 - पायावर डोके ठेवणे - नतमस्तक होणे/ चरणांशी लीन होणे

26 - उद्युक्त करणे - तयार करणे/ प्रेरणा देणे

27 - खेद होणे - खंत असणे, वाईट वाटणे

28 - गडबडून जाणे - गोंधळून जाणे

29 जोर चढणे - चेव चढणे / अंगात बळ संचारणे

30 पाठबळ असणे - पाठिंबा असणे

31 झुंबड लागणे - गर्दी होणे

32 अचंबा वाटणे - नवल वाटणे

33 जामानिमा करून बसणे - आवश्यक ते सामान घेऊन बसणे

34 आ वासून पाहणे/ आ वासून उभे राहणे - आश्चर्यचकित होणे

35 - धीर न होणे - धैर्य नसणे

36 - दवंडी पिटणे - जाहीर करणे

37 आटापिटा करणे - खूप प्रयत्न करणे

38 अफवांचे पीक येणे - खोट्या बातम्यांचा प्रसार होणे

39 फूस लावणे - लालूच दाखवून फसवणे

40 साळसूद डाव असणे - कुटील डाव साधणे ( to make a cunning plan)

41 रवाना होणे - निघून जाणे

42 टेकीला येणे - हैराण होणे/ त्रासणे

43 डंका वाजवणे - प्रसार करणे

44 धाय मोकलणे -  जोरा जोराने रडणे

45 धीर चेपणे - हिंमत वाढणे

बुधवार, 12 अगस्त 2020

पत्र - कचरे के डिब्बे की कमी

प्रश्न 6) नगरपालिका अधिकारी को एक पत्र लिखकर अपने क्षेत्र में कचरा पेटी की माँग करें।

17 जुलाई 2020

सेवा में,
माननीय नगराध्यक्ष,
अनुपम नगर,
नई दिल्ली -110077
विषय: कचरे के डिब्बे की कमी।

माननीय महोदय,
इस पत्र का लक्ष्य हमारे क्षेत्र में कचरे के डिब्बे की कमी के कारण होने वाली समस्याओं की ओर आपका ध्यान आकर्षित करना है।
हमारे इलाके में कचरे के डिब्बे नहीं हैं, जिसके कारण लोग सड़कों के कोने में कचरा फेंक रहे हैं। कचरे के ढेर दिन-ब-दिन बढ़ रहे हैं। यहां पैदा होने वाली बदबू के कारण यहां रहना असंभव हो गया है। यहाँ मच्छरों और मक्खियों की संख्या बढ़ती जा रही है। इन दिनों डेंगू के मामले पहले से ही ज्यादा हैं। लोग हर रविवार कचरे के ढेर जलाते हैं जिस के कारण धुआँ और वायु प्रदूषण बढ़ रहा है।
आवारा पशु पॉलिथीन की थैलियों के अंदर बचे हुए भोजन के टुकड़ों की तलाश में रहते हैं जो उनके खराब स्वास्थ्य और अंततः मृत्यु का कारण बन रहा है। राहगीरों को उस क्षेत्र से गुजरना बेहद मुश्किल लगता है। संबंधित अधिकारी ठीक से जवाब नहीं दे रहे हैं। महामारी का रूप लेने से पहले इसे रोकने की जरूरत है।
हमारे स्वास्थ्य और सुरक्षा के लिए कृपया इस मामले पर जल्द से जल्द ध्यान दें और कचरे के डिब्बों तथा सफाई की उचित व्यवस्था करवाएँ।
कष्ट के लिए क्षमा चाहता हूँ।

भवदीय,
अ ब क,
धर्मकॉलोनी,
अनुपम नगर
नई दिल्ली।
abc@gmail.com


पत्र - बार बार बिजली का जाना

17 जुलाई 2020
प्रति,
माननीय विद्युत अधिकारी,
विद्युत विभाग,
उल्हासनगर 421002

विषय: बार-बार बिजली का जाना।
माननीय महोदय,
मैं उल्हासनगर के गोलमैदान इलाके का नागरिक हूँ। इस विभाग में लगातार बिजली जाने की ओर आपका ध्यान आकर्षित करते हुए यह पत्र लिख रहा हूँ।।
एक दिन में कई बार बिजली जाने के कारण लोगों को काफी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। आधुनिक दुनिया में सब कुछ पूरी तरह से बिजली पर निर्भर है। जब तक बिजली नहीं रहती है, तब तक हमारा जीवन रुक जाता है। जब हमारी दिनचर्या खराब हो जाती है तो हम असहाय महसूस करते हैं। कुछ लोगों ने इस बीच जनरेटर का उपयोग करना शुरू कर दिया है, जिसकी वजह से ध्वनि प्रदूषण और वायु प्रदूषण बढ़ रहा है।
कई युवा ऑनलाइन कारोबार चला रहे हैं। उनके उपकरणों को चार्ज करना मुख्य मुद्दा है जिसका वे सामना करते हैं। डेयरी और बेकरी को चलाने वाले लोग पूरी तरह से व्यथित हैं कि बिना बिजली के अपने रेफ्रिजरेटर को इतने लंबे समय तक ठंडा कैसे रखा जाए। गर्मियों में, पंखे और कूलर के बिना हमारा जीवन बदहाल हो जाता है। लोगों ने कई बार इसकी शिकायत की लेकिन कोई फायदा नहीं हुआ।
आपसे नम्र निवेदन है कि लोगों के जीवन के सुचारू संचालन के लिए कृपया इस मामले पर जल्द से जल्द योग्य कार्यवाही करें और समस्या का समाधान करें।
धन्यवाद।
भवदीय,
अ ब क
धर्म कॉलोनी,
गोलमैदान
उल्हासनगर 421002
abc@gmail.com

वृक्षों का महत्त्व

 *वृक्षों का महत्त्व* ( निबंध )

वृक्ष हमारे जीवन का अस्तित्व हैं। पेड़ों के बिना धरती पर जीवन की कल्पना करना असंभव है। ये धरती पर अमूल्य सम्पदा के समान हैं। पेड़ों के कारण ही मनुष्य को अपनी मूलभूत आवश्यकताओं को पूरा करने के संसाधन प्राप्त होते हैं।

यदि पेड़ न हों तो पर्यावरण का संतुलन ही बिगड़ जाए और सब ओर तबाही मच जाए। आजकल मनुष्य विकास के नाम पर कंकरीट के जंगल बना रहा है और वे भी इस प्राकृतिक सम्पदा की कीमत पर।
यदि पेड़ काटने के साथ-साथ नए पेड़ों को नहीं लगाया गया तो इस ग्रह पर जीवन की संभावनाएँ ही खत्म हो जाएँगी।

पेड़ प्रकृति की वो देन है जिसका कोई विकल्प उपलब्ध नहीं है। पेड़ हमारा सबसे घनिष्ठ मित्र है। हमारे द्वारा लगाया गया पेड़ सिर्फ हमें ही लाभ नहीं पहुँचाता बल्कि आने वाली कई पीढ़ियों को लाभ पहुँचाता है।

हवा, पानी, खाने-पीने की सामग्री, ईंधन, वस्त्र, जानवरों का चारा अन्य कार्यों में प्रयोग करने के लिए लकड़ी सब हमें पेड़ों से ही मिलता है। पेड़ पर्यावरण से कार्बन डाईऑक्साईड लेकर बदले में ऑक्सीजन देते हैं।

पेड़ों पर कई जीव-जन्तु अपना घर बनाते हैं। यदि पेड़ न हों तो हम इन सब चीजों की कल्पना तक नहीं कर सकते।

लेकिन क्या मनुष्य इस प्राकृतिक संसाधन से अपना लाभ लेना ही जानता है या वह इसके संरक्षण और संवर्द्धन की और भी जागरुक है? वर्तमान की स्थिति देखकर ऐसा लगता है कि हम पेड़ों को बचाना तो चाहते हैं पर शायद उतना प्रयास नहीं कर पा रहे हैं जितना आवश्यक है।

ऐसी परिस्थिति में धीरे-धीरे प्रकृति का संतुलन बिगड़ता जाएगा और हम प्रकृति की इस अमूल्य सम्पदा को धीरे-धीरे पूरा खत्म कर देंगे। इस प्रकार इस धरती पर न जीवन होगा न जीव।

अतः हमें चाहिए कि हमारे आसपास हमें जितनी भी खाली भूमि दिखाई दे, हम वहाँ पौधारोपण करें और कुछ न हो सके तो अपने घर में गमलों में ही इस अमूल्य धरोहर को संरक्षित करें। यदि यह छोटा सा कदम हर व्यक्ति उठाएगा तो यह धरती और धरती पर जीवन सब खुशहाल रहेगा।

पेड़ों को हरा सोना भी कहा जाता है क्योंकि यह बहुत मूल्यवान सम्पदा है। धरती पर जीवन प्रदान करने वाली ऑक्सीजन और पानी प्रदान करने वाला मुख्य साधन पेड़ ही है। ऑक्सीजन प्रदान करने का कार्य और कोई नहीं कर सकता और पेड़ों के बिना पानी की कल्पना करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है।

पेड़ वायु प्रदूषण कम करने में हमारी सहायता कर पर्यावरण को शुद्ध रखते हैं। मात्र वायु प्रदूषण ही नहीं ये, हानिकारक रसायनों का छानकर जल को भी साफ करते हैं। हर उद्योग में पेड़ के उत्पाद का मुख्य योगदान रहता है। हमारे दैनिक जीवन में उपयोग होने वाली वस्तुओं में पेड़ों का बहुत महत्व है।
जितने अधिक पेड़ होंगे पर्यावरण भी उतना ही शुद्ध रहेगा। आजकल लोगों को वायु प्रदूषण के कारण कई प्रकार के साँस के एवं अन्य रोगों से पीड़ित होना पड़ रहा है।

यदि पेड़ होंगे तो हवा में मिली हानिकारक गैसों को शोषित कर हमें स्वच्छ हवा प्रदान करेंगे और रोगों से छुटकारा भी। यदि हम पेड़ों की संख्या में वृद्धि करेंगे तो ये प्राकृतिक रुप से हवा को स्वच्छ करने के साथ हमें और भी कई फायदे पहुँचायेंगे। इनकी वृद्धि से हम एयर कंडीशनर के उपयोग से बच कर इससे निकलने वाली हानिकारक गैसों से भी निजात दिलाते हैं। पेड़ के कारण ही हमें भरपूर वर्षा प्राप्त होती है।

पेड़ की जड़ें मिट्टी को बाँध कर रखती हैं जिनसे भूमि कटाव भी नहीं होता व भूमि जल को अच्छे से अवशोषित कर लेती है। यही जल भूमिगत जल बनकर हमें मनुष्य में पानी के अभाव से बचाता है। पेड़ हमें छाया प्रदान कर गर्मी के प्रभाव से भी धरती को बचाते हैं।

इस अमूल्य सम्पदा की कमी से धरती पर ग्लोबल वार्मिंग, सूखा, भूमि कटाव जैसे समस्यायें अपना विकराल रूप लेती जा रही हैं। यदि हम इस प्राकृतिक आपदाओं से बचना चाहते हैं तो हमें पेड़ों के संरक्षण की ओर कदम उठाने ही होंगे।

यदि आज हम इस दिशा में कार्य करेंगे तभी भावी पीढ़ी को भी इस ओर काम करने की प्रेरणा मिलेगी। ख़ुशी के अवसर पर हम पैसा खर्च करते हैं, दावतें करते हैं लेकिन इन सब के बजाय हम पौधारोपण और पेड़ों का संरक्षण करें तो ये सिर्फ हमारे जान-पहचान वालों के लिए ही नहीं बल्कि सारे सजीवों के लिए भी ख़ुशी का संकेत होगी।

भारतीय संस्कृति में तो वैसे भी पेड़ों की पूजा की बात कही गई है। एक जिम्मेदार नागरिक बनकर हमें यह सुनिश्चित करना चाहिये कि यदि विकास के नाम पर पेड़ कट रहे हैं तो क्या नए पेड़ लगाए भी जा रहे हैं या नहीं ?

ईष्वर ने मनुष्य को ही बुद्धि/विवेक का गुण प्रदान किया है। यदि इस बुद्धि का प्रयोग हम विकास के नाम पर प्रकृति को नुकसान पहुँचाने में करते रहे तो यह मनुष्य के विवेक पर धब्बा होगा। अतः आओ हम सब मिलकर संकल्प लें कि हम अपने लिए ही नहीं बल्कि पूरी प्रकृति के लिए पेड़ों के संरक्षण पर कार्य करेंगे और इस धरा को हरा-भरा करेंगे।

नदीचे आत्मकथन

 *नदीचे आत्मकथन*

मी तुमची आवडती नदी आहे.गंगा, भीमा, गोदावरी, कावेरी, ह्या माझ्या बहिणी आहे. त्या माझ्यावर खूप प्रेम करतात. मी झुळझुळ करत अनेक छोट्या गावातून वाहते. माझे पाणी खूप स्वच्छ आणि गोड आहे. तहानलेली माणसे, गुरे, वासरे इथे पाणी प्यायला येतात. त्यांचे समाधानी चेहरे पाहून मला खूप आनंद होतो. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा समाधान मिळतो.

माझ्या मनात कोणताही मतभेद नाही. सगळेजण माझ्याकडे येऊन माझे पाणी वापरतात. गावातील स्त्रिया दुरून दुरून येऊन पाणी भरतात. त्यांची मुले आनंदाने माझ्या पाण्यात खेळतात. म्हणून मी जरी डोंगरातून धावत खाली आले तरी गावातून जायला मला आवडते. काही भाविक व प्रेमळ त्या माझी पूजा करतात. माझ्या पाण्यामध्ये दिवे सोडतात व मला मातेसमान म्हणतात.

मला नेहमी अनेक भाऊ – बहिणी येऊन मिळायचे. त्यामुळे मी जास्त वेगाने वाढत असे. जसे मी कळसापासून पायथ्यापर्यंत वाहत जाते असे तेव्हा मला अन्य संकटाना सामोरे जावे लागत असे. मी सर्व संकटाना तोंड देऊन आपले ध्येय गाठत असते.
मी एखाद्या शूरवीर योद्ध्या प्रमाणे लढत असते आणि माझ्या जीवनात पुढे जात असते. या सगळ्या संकटांमध्ये माझ्या बहिण – भावंडानी माझी शेवट पर्यंत साथ दिली.
मी मैलोनमैल धावत जाऊन सर्व गावांना माझे शुद्ध जल वाटत राहिले. त्याच बरोबर सर्व पशु – पक्ष्यांची तहान भागवत राहिले. माझ्या पाण्यामुळे सर्व शेते हिरवीगार दिसू लागली.
तसेच कित्येक लोकांनी माझ्या पाण्यावर शेती करून आपले आजीविका भागवली. त्याच बरोबर शहरे पण अन्नधान्य संपन्न झाली.
बहुतेक लोक सुद्धा माझ्या पाण्याचा अति वापर कारखान्यात करू लागले. तसेच कारखान्यातील सांडपाणी माझ्या नदी पात्रात सोडू लागले. त्यामुळे मला खूप काही भोगावे लागले. आज मी अनेक लोकांमुळे प्रदूषित झाले. माझ्या या जल पात्रात अनेक जीव – जंतू, जलचर प्राणी – वनस्पती मरण पावू लागले आहेत. परंतु माणसाला याची काहीच चिंता नाही.
काही ठिकाणी मात्र गावातील घाण पाणी आणून सोडले जाते. कधीकधी गुरे धुतली जातात, स्त्रिया कपडे धुतात व पाणी घाण करतात. त्यांचे मला दुःख होते. लोकांनी शक्यतो माझे पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे. आजूबाजूला झाडे लावली पाहिजे. आज धरणे बांधून माझे पाणी लांबलांबच्या गावांमध्ये पोचले जाते. त्यामुळे दुष्काळ कमी होतो लोकांच्या उपयोगी पडून माझे जीवन धन्य होत आहे.   

मी तुम्हा सर्वाना सगळ्यात शेवटी अशी विनंती करते की, मला प्रदूषित करू नका. कारण माझे पाणी हे तुमच्याच उपयोगासाठी येते

शुक्रवार, 7 अगस्त 2020

परोपकार का महत्त्व

 परोपकार शब्द ‘पर + उपकार‘ दो शब्दों के मेल से बना है। परोपकार का अर्थ होता है दूसरों का अच्छा करना। परोपकार का अर्थ होता है दूसरों की सहायता करना। परोपकार की भावना मानव को इंसान से फरिश्ता बना देती है। परोपकार के समान कोई धर्म नहीं। मन, वचन और कर्म से परोपकार की भावना से कार्य करने वाले व्यक्ति संत की श्रेणी में आते हैं। परोपकार ऐसा कृत्य है जिसके द्वारा शत्रु भी मित्र बन जाता है।

जीवन में परोपकार का बहुत महत्व है। समाज में परोपकार से बढकर कोई धर्म नहीं होता ।  परोपकार एक उत्तम आदर्श का प्रतीक है।
गोस्वामी तुलसीदास ने परोपकार के बारे में लिखा है.
“परहित सरिस धर्म नहिं भाई।
पर पीड़ा सम नहिं अधमाई।”

दूसरे शब्दों में, परोपकार के समान कोई धर्म नहीं है। विज्ञान ने इतनी उन्नति कर ली है कि मरने के बाद भी हमारी नेत्र ज्योति और अन्य कई अंग किसी अन्य व्यक्ति के जीवन को बचाने का काम कर सकते है। इनका जीवन रहते ही दान कर देना महान उपकार है। परोपकार के द्वारा ईश्वर की समीपता प्राप्त होती है। इस प्रकार यह ईश्वर प्राप्ति का एक सोपान भी है।
भारतीय संस्कृति की भावना का मूलाधार परोपकार है। दया, प्रेम, अनुराग, करुणा, एवं सहानुभूति आदि के मूल में परोपकार की भावना है।

प्रकृति मानव के हित साधन में निरंतर जुटी हुई है। ईश्वर ने प्रकृति की रचना इस तरह से की है कि आज तक परोपकार उसके मूल में ही काम कर रही है। परोपकार प्रकृति के कण-कण में समाया हुआ है। वृक्ष कभी भी अपना फल नहीं खाता है, नदी अपना पानी नहीं पीती है, सूर्य हमें रोशनी देकर चला जाता है।
परोपकार के लिए वृक्ष फलते – फूलते हैं, सरिताये प्रवाहित है। सूर्य एवं चंद्रमा प्रकाश लुटाकर मानव के पथ को आलोकित करते है। बादल पानी बरसाकर धरती को हरा-भरा बनाते हैं, जीव- जंतुओं को राहत देते हैं। प्रकृति का कण-कण हमें परोपकार की शिक्षा देता है- नदियाँ परोपकार के लिए बहती है, वृक्ष धूप में रहकर हमें छाया देता है, चन्द्रमा से शीतलता, समुद्र से वर्षा, गायों से दूध, वायु से प्राण शक्ति मिलती है।
परोपकारी मानव के हृदय में शांति तथा सुख का निवास है। इससे ह्रदय में उदारता की भावना पनपती है। संतों का हृदय नवनीत के समान होता है। उनमे किसी के प्रति द्वेष तथा ईर्ष्या नहीं होती। परोपकारी स्वम् के विषय में चिंतित ना होकर दूसरों के सुख दुख में भी सहभागी होता है। परोपकार की ह्रदय में कटुता की भावना नहीं होती है। समस्त पृथ्वी ही उनका परिवार होती है। गुरु नानक, शिव, दधीचि, ईसा मसीह, आदि ऐसे महान पुरुष अवतरित हुए जिन्होंने परोपकार के निमित्त अपनी जिंदगी कुर्बान कर दिया।
हमें भी निरंतर परोपकार के कार्य करते रहना चाहिए और अपने जीवन को धन्य बनाना चाहिए। 

शुक्रवार, 17 जुलाई 2020

पत्र - जलभराव की समस्या

17 जुलाई 2020

प्रति,
माननीय नगराध्यक्ष,
उल्हासनगर मनपा
उल्हासनगर 421002


विषय: जल भराव की समस्या।
माननीय महोदय, 
इस पत्र के द्वारा उल्हासनगर में जल भराव की अत्यधिक समस्या की ओर आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूँ। बरसात के मौसम में जल जमाव लोगों के जीवन के साथ खिलवाड़ कर रहा है और इसे तुरंत कार्रवाई की जरूरत है।
बारिश के मौसम के कारण यह समस्या बढ़ गई है। महज पांच मिनट की बारिश के कारण नालियों के बहाव से हर जगह पानी भर जाता है। गड्ढों में पानी भर जाता है, जिससे खतरनाक दुर्घटनाएँ होने की संभावना बनी रहती है। कई मैनहोल खुले पड़े हैं जो बरसात के दिनों में घातक हो जाते हैं। घर से सुरक्षित बाहर निकलना लगभग असंभव हो गया है। कुछ घरों में पानी भी घुस जाता है। यह न केवल हमारे जीवन को प्रभावित करता है बल्कि डेंगू जैसी कई जल जनित बीमारियों को भी जन्म देता है। 
 मैं आपसे संबंधित अधिकारियों को सक्रिय करने का अनुरोध करता हूँ । किसी भी महामारी से बचने के लिए नालियों को तुरंत साफ किया जाना चाहिए। नालियों और मैनहोलों को ढंकना भी जरूरी है। किसी भी दुर्घटना को रोकने के लिए सड़कों और गलियों के उचित रखरखाव और मरम्मत की आवश्यकता है। मैं प्रार्थना करता हूँ कि कृपया इस समस्या पर जल्द कार्यवाही करें।
कष्ट के लिए क्षमा चाहता हूँ।
धन्यवाद।
भवदीय,
अ ब क
धर्म कॉलोनी
उल्हासनगर 421002
abc@gmail.com


गुरुवार, 16 जुलाई 2020

पत्र - स्ट्रीट लाइट की समस्या

प्रश्न 2) “स्ट्रीट लाइट की समस्या” विषय पर संपादक को एक पत्र लिखें.
सेवा में,
संपादक महोदय,
नवभारत टाइम्स,
नई दिल्ली -110077
विषय: स्ट्रीट लाइट की समस्या।
माननीय महोदय,
आपके प्रतिष्ठित अखबार के सम्मानित मंच के माध्यम से, मैं अपने क्षेत्र में स्ट्रीट लाइट की समस्या की ओर संबंधित अधिकारियों का ध्यान आकर्षित करना चाहूंगा।
हमने ख़राब स्ट्रीट लाइट के बारे में कई बार शिकायत की है लेकिन कोई फायदा नहीं हुआ। इसके कारण लोगों को काफी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। रात में सड़क के संकेत पूरी तरह से अदृश्य हो जाते हैं। स्पीड ब्रेकर, गड्ढे और मैनहोल स्पष्ट रूप से दिखाई नहीं देते हैं, जिससे हमारे क्षेत्र में घातक दुर्घटनाओं का खतरा अधिक होता है। इससे नागरिकों के जीवन को भारी खतरा है। यहाँ शाम के बाद बहुत अंधेरा और असुरक्षित माहौल हो जाता है।
अंधेरा होने के बाद महिलाएं और बच्चे अपने घर से बाहर निकलने से डरते हैं। सीसीटीवी कैमरे पूरी तरह से प्रभावहीन हैं। चोरी की घटनाएँ  बढ़ रही हैं। असामाजिक तत्वों को अपनी गतिविधियों को अंजाम देने के लिए प्रोत्साहन मिल रहा है और इस विषय पर किसी का ध्यान नहीं जा रहा है। यह वास्तव में नागरिकों में भय की भावना को बढ़ा रहा है। 
इस खतरे को रोकने के लिए तत्काल कार्रवाई की जरूरत है। यह पूरी तरह से समाज के कानून और व्यवस्था को ठप्प कर रहा है. इस गंभीर समस्या का संज्ञान लेने का अनुरोध है। स्ट्रीट लाइट का रखरखाव हमारे सुचारू और सुरक्षित जीवन के लिए तत्काल आवश्यक है।
आशा है कि आपके समाचार पत्र में यह समाचार आने के बाद संबंधित अधिकारी उस पर जल्द कार्यवाही करेंगे।
धन्यवाद।
भवदीय,
य र ल 
धर्म कॉलोनी
रामगढ़
नई दिल्ली -110077

मंगलवार, 30 जून 2020

सैनिकाचे आत्मकथन

या मुलांनो या ! मला वाटलेच होते की मी गावात आलो की तुम्ही मला भेटायला येणार ! काय म्हणालात ? कसं वाटते मला सैन्यात गेल्याबद्दल? अरे बाबांनो, सैन्यात जाणे माझे ध्येयच होते. थांबा, मी तुम्हांला माझी कहाणीच सांगतो.

माझे वडील भारतीय सैन्यात होते. मी तीन वर्षांचा असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले. आजोबांनी व आईने मला मोठे केले. सैन्यात दाखल व्हायचे असे मी ठरवले. पाचव्या इयत्तेपासूनच मी सातारच्या सैनिकी शाळेत दाखल झालो. मी वसतिगृहात राहायचो. मग मी सैनिकी महाविदयालयात नाव घातले. तेथे पदवी मिळवतानाच मला सैन्यात नोकरी मिळाली. पहिले दीड वर्ष वेगवेगळे तांत्रिक शिक्षण घेण्यात गेले. ते पूर्ण झाल्यावर 'मेजर' म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली.

आमचे काम खूप अवघड आहे. आम्ही जेथे असतो तो भाग अतिशय थंड आहे. कारगिलसारखा अतिथंड प्रदेश असो अथवा उन्हाचे चटके देणारे वाळवंट असो, आम्ही डोळयांत तेल घालून सीमेची राखण करतो. जमीनीवरच नव्हे तर समुद्रातही आमचे बांधव जहाजांवरून शत्रूवर नजर ठेवतात. शत्रूकडून मारा सुरू झाला, तरी आम्ही आपले ठाणे सोडत नाही. शत्रूच्या हल्ल्यात आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते. 

सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते, हेच त्याचे कर्तव्य आहे. मनात बायको पोरांचा कितीही विचार असला, घराची कितीही आठवण येत असली तरी शत्रूपासून देशाची रक्षा करणे हेच त्याचे  ध्येय असते. आम्ही फक्त बंदूक घेऊन शत्रूशी लढण्याचे काम करतो, असे नाही. कुठे पूर आला, भूकंप आला तरी आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी धावतो. दुर्गम पर्वतीय भागात आम्ही रस्ते बांधतो. तीर्थयात्रेला जाणाऱ्यांचे संरक्षण करतो. दंगलीच्या वेळी, निवडणुकींच्या वेळी शांतीचे वातावरण निर्माण करण्यासाठीही सैन्याची मदत घेतली जाते.

माझ्या सैनिकी जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही. हल्ली तर अतिरेकी हल्ल्यांचे संकट सतत घोंघावत असते पण माझ्या देशाच्या रक्षणासाठी मी सदैव तयार असतो. ते मी माझे परमभाग्य समजतो."

तिरंगी झेंड्याचे आत्मकथन

मुलांनो, मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. मी तुमच्या मातृभूमीचे प्रतीक आहे. आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. 1857 पासूनच भारतीय जनता इंग्रजांच्या गुलामगिरी पासून मुक्त होण्यासाठी तळमळत होती. मी स्वातंत्र्यलढ्यात नेहमी त्यांच्यासोबत राहिलो.
काळाच्या ओघात माझे रूप बदलत गेले. माझ्यावर कधी सूर्य, चंद्र तर कधी कमळ, कधी चरखा अशी चित्रे रेखाटली गेली. 1920 नंतर मी तिरंगा बनलो. माझ्यासाठी केशरी, पांढरा व हिरवा हे तीन रंग निश्चित केले गेले.
1947 मध्ये शहीदांच्या बलिदानाला यश आले.भारताचे स्वातंत्र्य समोर दिसू लागले होते. 23 जून 1947 ला माझे स्वरूप ठरविण्यात आले. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉ राजेंद्रप्रसाद. 18 जुलै 1947 रोजी माझ्याबाबतीत अंतिम निर्णय घेण्यात आला. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला पहिल्यांदा सर्वांसमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. 

स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. माझ्याबाबतीत तयार केलेले नियम तुम्हाला माहीत असले पाहिजेत. ते आता सांगतो.

भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:3 असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये निळ्या रंगाचे चोवीस आर्‍या असणारे अशोकचक्र असेल.

मला करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी खादीचे वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. 

माझ्यातील रंगांचे आशय आता सांगतो. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग देशाच्या समृद्धी व हिरव्यागार भूमीचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे.

वर्तमान काळात मला हे पाहून दुःख होते की 15 आगस्ट, 26 जानेवारीच्या दिवशी तुम्ही कागदाचे आणि प्लास्टिक चे तिरंगे विकत घेतात. हेच राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी कचरा पेटीत किंवा रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसून येतात. जे की खूप चुकीचे आहे. माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही माझा सन्मान ठेवावा कारण माझा अपमान म्हणजे भारत देशाचा अपमान आहे.

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...